सावंतवाडी (प्रतिनिधी)
दोन ठाकरे बंधू एकत्र ; सावंतवाडीत सेना-मनसेचा जल्लोष
राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यावर मराठी माणसांचा विजय म्हणून वरळी डोममध्ये आज कार्यक्रम पार पडला. दोन ठाकरे बंधू तब्बल १९ वर्षांनी एकत्र येत दोघांनीही दमदार भाषणे केली. यानंतर सिंधुदुर्गात सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला.
