आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे निष्ठा यात्रेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ ; निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद
कणकवली दि १८ जुलै ( तुळशीदास कुडतरकर)
उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे. आज गुरुवारी या निष्ठा यात्रेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे करण्यात आला. प्रथमतः माणगाव येथील श्री. दत्तमंदिर टेंबेस्वामी मठ येथे दर्शन घेत श्रीफळ वाढवून निष्ठा यात्रेला सुरुवात करण्यात आली. सलग ४५ दिवस हि निष्ठा यात्रा सुरु राहणार आहे. माणगाव येथे पहिल्याच दिवशी या निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. पुन्हा उद्धवजी मुख्यमंत्री ही निष्ठावंतांची खात्री अशी टॅगलाईन निष्ठा यात्रेला देण्यात आली आहे.
