एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा – विनय सामंत

0 minutes, 1 second Read

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा – विनय सामंत

एआय तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, असा सल्ला आयआयटी (आयएसएम) धनबाद येथील सीनिअर प्रोडयूसर मॅनेजर विनय सामंत यांनी दिला.कणकवली तालुका व्यापारी संघ, शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एआय माणसाच्या भविष्यासाठी कसा आकार घेत आहे या विषयावर विनय सामंत यांचा कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात वेबिनार आयोजित केला होता. वेबिनारचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झाले.

 

 

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. कणकवली कॉलेज प्राचार्य वाय. व्ही. महालिंगे, श्री. दीपक बेलवलकर, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर, खजिनदार  विलास कोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, राजेश राज्याध्यक्ष, कणकवली महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रमुख अमरेश सातोसे आदी मान्यवर उपस्थित होते. आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राजश्री साळुंखे यांनी आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय)चे महत्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असा सल्ला दिला.

दीपक बेलवलकर यांनी हा वेबिनार घेण्यामागील उद्देश सांगितला. वेबिनारमध्ये विनय सामंत यांनी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, तिचा इतिहास, तसेच चॅटजीपीटी कसे कार्य करते याबाबत मार्गदर्शन केले.  याशिवाय त्यांनी इमेज जनरेशन, प्रोग्रॅमिंग व टूल क्रिएशनसाठी वापरल्या जाणाºया काही अक टूल्स देखील दाखवले. प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांचे शंका निरसन केले. अक टूल्स जबाबदारीने वापरावीत आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या टीप्सत्यांनी दिल्या. संघाचे सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *