कणकवली ( प्रतिनिधी)
स्वतः जिल्ह्याचा आका होण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केले ; माजी आमदार वैभव नाईक यांची राणेंवर खरमरीत टीका
विनायक राऊतांसोबत आम्ही सर्वजण एकदिलाने जनहिताचे काम करतोय
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचे राजकीय अस्तित्व संपले असताना ज्या रवींद्र चव्हाण यांनी राणेंचे राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी मोठी रसद पुरविली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक निवडणुकीसाठी हि रसद देण्यात आली. परंतु आज स्वतः जिल्ह्याचा आका होण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केले आहे. आज रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत? त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवले जाते? ज्यांनी राणेंना मदत केली त्यांना वेळोवेळी बाजूला फेकल्याचा राणेंचा इतिहास आहे. हे आधी लक्षात घेऊन मग नितेश राणेंनी आमच्यावर आरोप करावेत. अशी खरमरीत टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
