कुडाळ दि ११ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आचरा- हिर्लेवाडीतील युवकांनी हाती घेतली मशाल
कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील आचरा-हिर्लेवाडी गावामधील युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.आचरा गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला असल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.
