कणकवली शहरातील आधार सेवा केंद्र बनली ‘निराधार ‘ ; केवळ एकच केंद्र सुरू; नागरिकांना सोसावा लागतोय त्रास

0 minutes, 1 second Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली शहरातील आधार सेवा केंद्र बनली ‘निराधार ‘ ; केवळ एकच केंद्र सुरू; नागरिकांना सोसावा लागतोय त्रास

कोणत्याही शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो मात्र कणकवली शहरात आधार सेवा देणारे केवळ एकच केंद्र सद्यस्थितीत सुरू असल्याने आधार विषयक कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कणकवली तहसील कार्यालयातील एकमेव आधार सेवा केंद्र सद्यस्थितीत सुरू आहे. या केंद्रावर नागरिकांना चांगली सेवा मिळत असली तरी गर्दीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे गैरसोय होत आहे.

 

 

देशभरात शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. त्यामुळे नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डमध्ये सुधारणा करणे, जन्मतारीख सुधारणा करणे, स्पेलिंग मिस्टेक असल्यास दुरुस्त करणे त्याचप्रमाणे ठसे व अन्य त्रुटी दूर करण्यासाठी आधार सेवा केंद्र हे महत्त्वाचे केंद्र समजले जात आहे. राजकीय दृष्ट्या त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून कणकवली शहराची ओळख आहे त्यामुळे या शहरात शासकीय कामकाजा बरोबरच अन्य कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा सुरू असते .विशेष म्हणजे आधार कार्ड मध्ये कोणत्या तालुक्यात सुधारणा करण्याची मुभा असल्याने अनेक जण कणकवलीचा आसरा घेणे पसंत करतात त्यामुळे आधार विषयक सेवेसाठी दररोज अनेक जण कणकवलीत दाखल होतात मात्र कणकवली पंचायत समिती व बांधकाम बांधकाम विभाग येथील आधार सेवा केंद्र सद्यस्थितीत बंद असल्याने नागरिकांना कणकवली तहसील कार्यालयाचा आधार घ्यावा लागतो मात्र येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने तासंतास वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर येते. विशेष म्हणजे लहान मुले त्याचप्रमाणे वृद्ध यांची गैरसोय होत असल्याने कणकवली शहरात आणखी आधार सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

शासकीय कार्यालयाच्या जागेतच आधार केंद्र सेवा देता येते. त्यामुळे खाजगी आधार सेवा केंद्र मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या आवारात असलेल्या आधार सेवा केंद्रांवर आपल्या कामकाजासाठी जावे लागते. विद्यमान स्थितीत कणकवली येथील दोन आधार सेवा केंद्र बंद असल्याने कणकवली तहसील कार्यालय येथे असलेल्या आधार सेवा केंद्रात नागरिकांची गर्दी होत आहे त्यामुळे अनेक वेळा नागरिके पूर्वीच्या ठिकाणी आधार केंद्र सुरू होते तेथे चौकशीसाठी जातात मात्र तेथील आधार सेवा केंद्र बंद असल्याने नाईलाजास्तव मागे परतावे लागते.

आता काही दिवसानंतर दहावी बारावी परीक्षा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांची ऍडमिशन साठी गर्दी होणार आहे या पार्श्वभूमीवर आधार कार्ड मधील ऑपरेशन साठी विद्यार्थ्यांना आधार सेवा केंद्रांचा आधार घ्यावा लागणार आहे .त्यामुळे कणकवली शहरातील आधार सेवा केंद्र सुरू करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *