भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव निमित्त निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन ! ; बोर्डवे येथे १० एप्रिल रोजी भगवान महावीर जनकल्याण सोहळा !

0 minutes, 2 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव निमित्त निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन ! ; बोर्डवे येथे १० एप्रिल रोजी भगवान महावीर जनकल्याण सोहळा !

सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार आयोजित भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा २५५० निमित्त खुलागट व विद्यार्थी गट (इ.१ ते १२) गट या दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

खुला गट (पदवीधर )या करीता वर्तमान काळात अहिंसा व अपरिग्रह तत्वांचे महत्व,,(इ.१ते १२पर्यंत),१)भगवान महावीर, व जीवनदर्शन व शिकवण,२)प्रथम तीर्थकर भ.ऋषभदेव चरित्र व शिकवण .असे विषय असून शब्द मर्यादा ८०० ते १००० आहे.निबंध मराठी,हिंदी,इंग्रजी,एका बाजूने लिहावेत. पहिल्या पानावर नाव,पत्ता,मोबा.इमेल ,विद्यार्थी ने शाळेचे /महाविद्यालयाचे नाव ,वर्ग लिहावा. पारितोषिक खुला गट अनुक्रमे रु.८००/-,रु ५००/-रु ३००/-विद्यार्थी गट रु ५००/-रु ३००/-रु २००/-तसेच प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ तीन पुरस्कार भगवान महावीर जनमकल्याण महोत्सव गुरुवार दि. १० एप्रिल रोजी स.११ वा. बोर्डवे येथे सोहळ्याचे अध्यक्ष अनिल सुभाष मोहारे प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग तसेच प्रमुख पाहुणे बाळासाहेब श्रीपाल शेटे कवलापूर सांगली यांच्या उपस्थितीत भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव सोहळ्यात प्रदान करण्यात येतील.

निबंध स्वतः अथवा पोस्ट कुरिअर द्वारे तसेच पिडीएफ द्वारे व्हाट्सअप वर पुढील पत्त्यावर ५ एप्रिल पर्यंत पाठवावे. डॉ.दीपक म.तुपकर शिवम अपार्टमेंट ,वैश्यवाडा सावंतवाडी ४१६५१० मोबा.९४२२३९४०१० पाठवावेत. तसेच भगवान जन्मकल्याण महोत्सवात सहभागी व्हावे . असे आवाहन अध्यक्ष डॉ दीपक तुपकर,व कार्यवाह दिपराज बिजितकर यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *