सावंतवाडी – प्रतिनिधी
वाहतूक प्रशासनाचा अजब कारभार गाडी मुंबईला गेलीच नाही तरीही आला 2000 दंड
आपली गाडी कधीही मुंबईला नेण्यात आलेली नसताना मुंबईच्या एका महामार्गावर मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने गाडी चालविल्याबद्दल २ हजाराचा दंड महाराष्ट्र वाहतूक पोलीस प्रशासनाने आपल्याला ठोठावला आहे, अशी माहिती मिठबाव येथील ज्येष्ठ नागरिक सुभाष धोंडू शिरवडकर यांनी दिली आहे. या दंड वसुलीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमार्फत आपणाला नोटीसही बजाविण्यात आली असून या नोटीसीमुळे आपणाला नाहक मनस्ताप झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
